(प्रतिनिधी : नितीन रमेश जाधव)
बदलापूर : मध्य रेल्वे लोहमार्गावरील बदलापूर रेल्वे स्टेशन हे चाकरमान्यांच्या दृष्टीने अत्य महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबई -बदलापूरच्या अप-डाऊन दिशेने दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. रात्री 23:30 कर्जत लोकल गेल्या नंतर 12:24 ची बदलापूर दिशेने येणारी लोकल आहे. या वेळेच्या मध्यंतरी लोकलसेवा नसल्याने बदलापूर दिशेने प्रवास करण्यासाठी एक तास वाट बघावी लागते. या दरम्यान प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी या हेतूने आज बेस्ट सामाजिक संस्थेच्या वतीने स्टेशन प्रबंधक बदलापूर यांना मागणी निवेदन पत्र देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रात्री वेळ 23:51 व 12:04 ला अंबरनाथ पर्यंत सुटणारी दोन्ही लोकल सेवा बदलापूर रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवर्तित करण्यात यावी, अशा स्वरूपाचे मागणी निवेदन पत्र देण्यात आले.
0 Comments